भ्रष्टाचाराचे आरोप व ईडीचा ससेमिरा लावलेल्यांकडून मोदीजी स्वत:चे गोडवे कसे काय गाऊन घेतात? : गोपाळदादा तिवारी
पुणे, दि. 30 ऑगस्ट 2023 मध्यरात्री वेषांतरे करून, राजकीय घरफोड्या करून, केंद्राच्या आशिर्वादाने संख्याबळ हस्तगत करून, अडनीट वेळी सत्तेवर आलेल्या ‘भाजप प्रणीत सरकारला’ प्रशासन ही चालवता येऊ नये ही भाजप’ची नामुष्की असल्याचे काँग्रेसने म्हंटले आहे. ‘ना खाऊंगा ना खानेदुंगा’ म्हणणाऱ्या ढोंगी नेतृत्वाने, ‘भ्रष्टाचाराचे आरोप व ईडी’चा ससेमिरा लावलेल्यांकडुनच ‘सत्तेत बसवल्यावर’…’मोदी…
इंदिरा वसाहतीमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
पुणे, 15 ऑगस्ट 2023 संविधान अभ्यास गटाच्यावतीने इंदिरा वसाहत येथे आज स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. सफाई कामगार भगिनी संगीत वर्स, रेखा भोसले, रेखा नागटिळक, रंजना भडकवाड यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. झेंडा फडकविण्याचा मान मिळाल्याने त्यांनी खूप आनंद व समाधानाची भावना व्यक्त केली. यावेळी…
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त साहित्यजागर
पुणे, दि. 1 ऑगस्ट 2023 कस्तुरबा व इंदिरा वसाहत येथे ज्ञानतपस्वी वाचनालय व संविधान अभ्यास गटाच्यावतीने आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 वी जयंती साजरी करण्यात आली. कस्तुरबा वसाहत येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अविनाश भाऊ कांबळे, दत्ता भाऊ रणदिवे, लताताई…
पाटील इस्टेटमध्ये मोफत मौखिक व दंत तपासणी शिबिर
पुणे, 4 जून 2023 "जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त" (31 मे) पुण्यातील शिवाजीनगर पाटील इस्टेटमध्ये मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने १६२ लोकांचे "मोफत मौखिक व दंत तपासणी शिबिर" आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात वस्तीमध्ये जनजागृती फेरी काढण्यात त्यात मॉडर्न महाविद्यालय गणेश खिंड येथील ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.या शिबिरात तोंडाचा कर्करोग, लहान…
औंध जिल्हा रुग्णालयात महाराष्ट्राला दिशादर्शक ठरू शकेल अशा उपक्रमाची सुरुवात
दीपक जाधव कोविडच्या जागतिक साथीमध्ये सरकारी आरोग्य व्यवस्थेचे महत्त्व ठळकपणे अधोरेखित झाले आहे. यापार्श्वभूमीवर सरकारी हॉस्पिटल आपल्या हक्काची आहेत त्यांना जपले पाहिजे ही भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. औंध जिल्हा रुग्णालयात या लोकभावनेला तिथल्या बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी ही उचलून धरले आहे. त्यातून औंध जिल्हा रुग्णालय नागरिक व कर्मचारी यांची मिळून संवाद…
रवीभाऊ, तुम्ही खूप मोठ्या सत्तेला हादरा देऊन एका बदलाची सुरुवात केलीय
प्रिय रविभाऊ सस्नेह नमस्कार, मोठ्या झोकात कसबा जिंकल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन. तुमचे नाव आज देशभर गेले आहे. तुमच्या तसेच संपूर्ण महाविकास आघाडीच्या सगळ्या कष्टाचे अक्षरशः चीज झाले आहे. लोकांनी पैसे, गुंडगिरी, जात-पात सारे झुगारून तुम्हांला विजयी केले आहे. हिंदू-मुस्लिम फूट पाडण्याचा डाव ही लोकांनी यशस्वी होऊ दिला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र…
पत्रकारितेची चौकट ओलांडून वेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न
केवळ वेब पोर्टलवर याबाबतच्या बातम्या, लेख लिहून हे साध्य होणे अवघड व अपुरे वाटते. त्यामुळे पत्रकारितेची चौकट ओलांडून बातम्या लिहण्याबरोबरच प्रत्यक्ष कृती करण्यास सुरुवात केली आहे.
तुम्ही शेकडो न्यूज चॅनल, पेपर विकत घ्या पण टोकदार प्रश्न विचारणारी पत्रकारिता कधीच संपवू शकणार नाही
रवीशचे हे शब्द खूप उमेद वाढवणारे आहेत. तो कुठेही खचलेला नाही किंवा निराश ही झालेला नाही. तो म्हणतोय, "माझे घरटे जरूर ताब्यात घेतले आहे, मात्र मला त्याबाहेर खूप मोठे आकाश दिसते आहे."
राहुल गांधींनी जाणून घेतले सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न
कन्याकुमारीपासून निघालेली भारत जोडो यात्रा जशी पुढे सरकत आहे तशी ती अधिकाधिक प्रभावी होत चालली आहे. केवळ या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय म्हणून नाही तर यात्रेत घडत असलेल्या संवाद प्रक्रिया आणि विचारमंथनामुळे ती महत्त्वाची बनत आहे.
‘भारत जोडो’च्या वादळाचे महाराष्ट्रात मनःपूर्वक स्वागत
'सामाजिक चळवळीतील लोकांनी आपल्या सामाजिक कामांवरच लक्ष द्यायचे, जाहीर राजकीय भूमिका घेणे शक्यतो टाळायचे' असा एक मतप्रवाह आहे. मला वाटते सद्य परिस्थितीमध्ये चळवळीतील कार्यकर्त्यांनी तो विचार बाजूला ठेऊन ठाम राजकीय भूमिका घेणे आवश्यक बनले आहे.