धार्मिक उन्माद निर्माण करून समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवावा
आम्ही स्वत: देखील हरी-नाम, नामस्मरण व अखंड हनुमान चालीसाचे सप्ताह - अखंडीत केले आहेत. त्यामुळे हनुमान चालीसाचे महत्व व त्याचे गांभीर्य आमचे ठायी पुरेपूर आहे. तरी धार्मिक उन्माद निर्माण करण्याचा पोरकटपणा करणाऱ्यांना जनता रस्त्यावर येऊन धडा शिकवेल.