नर्मदेच्या खोऱ्यात तरुणपणीच आलो हे मात्र खूप बरे झाले, कारण इथून मिळालेली प्रचंड ऊर्जा आता यापुढे वापरता येईल
नर्मदेच्या खोऱ्यात संवाद यात्रेसाठी जात असल्याने काही दिवस मी पुण्यात नसेन परत आल्यावर आपण मीटिंग घेऊयात असं एका मित्राला सांगत होतो. त्यावेळी तो बोलून गेला. "अरे, ते आंदोलन तर आता संपले ना, मग आता कशासाठी तिकडे चालला आहे." त्यावर काही न बोलता स्मितहास्य करून मी तिथून निघालो. मात्र आता त्याला मी तिथे का गेलो होतो, हे नक्की सांगावसे वाटतेय.